परब्रह्म भगवान श्री स्वामी महाराज स्वरुप वर्णन



॥ श्री स्वामी समर्थ ॥
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
॥ स्वामी वैभव दर्शन ॥
पुष्प 20 वे
परब्रह्म भगवान श्री स्वामी महाराज स्वरुप वर्णन
स्वामी भक्तांनो,
            स्वामींचे अंतरंगीचे शिष्य श्री आनंदनाथ महाराज यांच्या आत्मानुभवातून प्रकट झालेले स्वामींचे दिव्य काव्यामृत आपण मागील 19 पुष्पापासून पाहात आहोत. हे आपले 20 वे पुष्प आहे. आपण ही आनंदनाथ महाराजांच्या अभंगाची लेखमाला 21 पुष्पानंतर तुर्तास थांबविणार आहोत. ती पुन्हा काही दिवसांनी सुरु करु...! काही दिवसांची विश्रांती घेऊन आपण पुन्हा स्वामीसुत महाराजांचे अभंग चर्चेसाठी घेणार आहोत. स्वामीसुत महाराजांचे 21 अभंग पाहून पुन्हा दिगंबर दास महाराजांचे 21 अभंग पाहणार आहोत. असे पुढील नियोजन आहे.
            त्यामुळे हे आपले आनंदनाथ महाराजांच्या अभंगाचे शेवटून दूसरे पुष्प आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी.......!

दीनजन उद्धारक परब्रह्म स्वामी महाराज



॥ श्री स्वामी समर्थ ॥
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
॥ स्वामी वैभव दर्शन ॥
पुष्प 19 वे
 दीनजन उद्धारक परब्रह्म स्वामी महाराज
स्वामी भक्तांनो,
           परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे भक्तवत्सल भक्ताभिमानी आहेत. आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे सर्वाधिपती स्वामी महाराज हे अल्पशा सेवेने ही संतुष्ट होतात, त्यांना फक्त भाव महत्वाचा आहे. जसे  भगवान श्री कृष्णाने सुदामाला न मागता ही सर्व काही दिले, तसेच स्वामी महाराज आपल्या भक्तांना न मागता ही सर्वस्व देऊन टाकतात. तेव्हा अशा प्रेमळ व सर्वसत्याधिश स्वामी महाराजांच्या दरबारी याचक म्हणून उभे राहण्यापेक्षा त्यांच्याशी एकरुप होऊन राहावे, असे आनंदनाथ महाराज आजच्या अभंगातून सांगणार आहेत. स्वतः आनंदनाथ महाराज हे स्वामी स्वरुपात एकरुप झाल्यामुळे ते स्वामी महाराजांशी कधी मित्रत्वाने, कधी शिष्यत्वाने तर कधी पुत्र या नात्याने व्यवहार करत असत. कारण स्वामी महाराज व आनंदनाथ महाराज यांच्यात द्वेताद्वेत भेद ऊरलाच नव्हता, ते एकरुप आणि एकतत्व झाले होते.

मायामोहनाशक सर्वेश्वर स्वामी महाराज



॥ श्री स्वामी समर्थ ॥
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
॥ स्वामी वैभव दर्शन ॥
पुष्प 18 वे
मायामोहनाशक सर्वेश्वर स्वामी महाराज
स्वामी भक्तांनो,
            परमार्थ करत असताना सर्वात मोठा अडसर ठरतो तो आपला प्रपंच आणि आपली त्याप्रती असणारी ओढ ! मनुष्य आपल्या संसारात एवढा एकरूप झालेला असतो की, त्याला संसारापेक्षा ही चिरंतन सुख काही आहे, याची कल्पना ही नसते किंवा कल्पना असली तरी प्रपंचाचा मोह सुटत नाही. एवढे आकर्षण व हव्यास या नश्वर प्रपंचाचा मनुष्याला आहे. काही जण तर या नश्वर प्रपंचात, मायामोहात एवढे गुरफटतात की, आपल्या कुटुंबाशिवाय दूसरे काही विश्वच नाही, अशी यांची धारणा आहे.

।। अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज ।।



॥ श्री स्वामी समर्थ ॥
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
॥ स्वामी वैभव दर्शन ॥
पुष्प 17 वे
।। अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज ।।
स्वामी भक्तांनो,
             आजचा आपला अभंग हा गुरुभक्तीचे महत्व समजाऊन सांगणारा आहे. भूतलावर जन्म घेतल्यानंतर प्रत्येकाला गुरु हा करावाच लागतो, त्या शिवाय गत्यन्तर नाही ! असे आपल्या धर्मात स्पष्ट केलेले आहे. सद्गुरुचे महत्व सांगताना एके ठिकाणी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, 'सद्गुरु वाचोनी सापडेना सोय । धरावे पाय आधी आधी ।।'  किंवा यापुढे जाऊन सद्गुरु आपल्या जीवनात नेमके काय परिवर्तन करतात हे सांगताना तुकाराम म्हणतात, 'आपणा सारीखे करिते तात्काळ । नाही काळ वेळ तयालागी ।।'  अशा प्रकारे तुकोबांनी सद्गुरु माहात्म्य वर्णन केले आहे.
           सद्गुरु आपला मार्गदर्शक असतो, आपल्या जीवनात नवचैतन्य निर्माण करणारा उर्जास्रोत असतो! तेव्हा तो योग्य मार्ग दाखवणारा आणि आत्मज्ञानी असला पाहिजे, तरच आपले कल्याण करेल ! जर आपला गुरु आपल्याला चूकीच्या दिशेने घेऊन जात असेल तर आपण वेळीच सावध होऊन अशा पाखंडी व्यक्ति पासून आपली सुटका करुण घ्यावी आणि योग्य सद्गुरु जवळ करावा, हेच आपल्याला कल्याणकारक असते.

।। ब्रह्माण्डनायक स्वामी महाराज ।।



॥ श्री स्वामी समर्थ ॥
श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
॥ स्वामी वैभव दर्शन ॥
पुष्प 16 वे
।। ब्रह्माण्डनायक स्वामी महाराज ।।
स्वामी भक्तांनो,
           परब्रह्म स्वामी महाराज हे ब्रह्माण्डनायक आहेत. ब्रह्माण्डातील सर्व गोष्टीवर त्यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. स्वामींच्या पुढे सर्व जण शरणांगत आहेत. जो स्वामींना शरण गेला, त्याला अन्य काही करायची गरज नाही. आणि जो स्वामी महाराज सोडून इतरत्र फिरतो त्याला शेवटी स्वामींच्या चरणी आल्याशिवाय गत्यन्तर नाही. असे स्वामींचे श्रेष्ठत्व आहे. तेव्हा सर्वत्र फिरून किंवा वळसा घालून स्वामींच्या पायी येण्यापेक्षा पहिल्यांदाच स्वामी चरण धरणे इष्ट आहे. हिच शिकवण देणारा आपला आजचा अभंग आहे. आजच्या अभंगातून स्वामींचे ब्रह्माण्डनायकत्व आनंदनाथ महाराज आपल्या मनावर ठसवणार आहेत. तेव्हा आपण आता अभंग पाहू या....!